मुंबई: पश्चिम महामार्गावर ‘सिग्नल’मुक्त प्रवास
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईप्रत्येक तासाला पाच हजार वाहनांची वर्दळ... वांद्रे ते दहिसर प्रवासासाठी ४० मिनिटांऐवजी खर्च होणारा तास-दीड तासांचा वेळ... …पश्चिम द्रुतगती महामार्गाची गेल्या अनेक वर्षापासूनची ही कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीने योजना आखली आहे. महामार्गावरील जंक्शन ठिकाणे 'सिग्नल'मुक्त करण्याबाबत महत्त्वाचा विचार त्यात होणार असून, कोंडी फोडण्यासाठीचे सर्व उपाय अंमलात आल्यास आगामी काळात या महामार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्या काही वर्षांपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भार कमालीचा वाढला आहे. गर्दीच्या वेळी या महामार्गावरून प्रवास करताना जीव मेटाकुटीला येतो. वास्तविक पाहता या महामार्गावर वाहनांचा वेग ताशी ४० कि.मी. एवढा अपेक्षित आहे. या वेगाने वांद्रे ते दहिसर हे २६ कि.मी.चे अंतर ४० मिनिटांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हे गणित बिघडले आहे. ४० मिनिटांऐवजी गर्दीच्या वेळी तास-दीड तासांचा वेळ खर्ची पडतो.हे चित्र बदलण्यासाठी या मार्गासाठी पर्यायी आराखडा बनवण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव असून नेमका आराखडा कसा असावा यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदांमधून अंतिम सल्लागारांची निवड होईल. त्यानंतर त्यास नेमके काय अपेक्षित आहे याबाबत माहिती देऊन तसा विस्तृत आराखडा तयार केला जाईल. मेट्रोची कामे संपल्यानंतरही दिलासापश्चिम उपनगरात सध्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व; तसेच डी.एन. नगर ते अंधेरी या दोन मेट्रो मार्गांची कामे प्रगती पथावर आहेत. हे दोन्ही मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर महामार्गावरील ताण काहीसा कमी होणार आहे. अपेक्षित उपाय- जंक्शनवर होणारी वाहतूककोंडी हा डोकेदुखीचा विषय आहे. अनेक जंक्शनच्या ठिकाणी सिग्नलमुळे मोठ्या प्रमाणावर वाहने खोळंबून वाहतूक कोंडी वाढते. हे जंक्शन सिग्नलविरहित करण्यावर भर दिला जाणार आहे. - डावीकडे किंवा उजवीकडे वळण घेणारी वाहने एकाच मार्गिकेमधून जात नाहीत. उजवीकडे वळण घेण्याच्या तयारीत असलेली वाहने असतात मार्गिकेच्या डाव्या बाजूला. ही वाहने मागील वाहनांना अडथळा ठरतात. त्यामुळे वळण घेणारी वाहने एकाच मार्गिकेत असावी या दृष्टीने आखणी.- महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलांची क्षमता वाढवता येईल का, सध्याच्या परिस्थितीत काही उड्डाणपुलांची जागा बदलणे गरजेचे आहे का, आणखी नव्या पुलांची आवश्यकता आहे का, उड्डाणपुलांवरील मार्गिका वाढवता येतील का, या प्रश्नांचाही विचार केला जाणार.- रस्त्याकडील सर्व्हिस रोडचा प्रभावी वापर करण्यावर, महामार्गावर कुठेही पार्क होणाऱ्या वाहनांचा प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार.-वांद्रे ते दहिसरदरम्यान प्रवासाच्या वेळेत किमान २५ मिनिटांची बचत करण्याचा विचार. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2AUHl10
from Maharashtra Times https://ift.tt/2AUHl10
Post a Comment