मराठवाडा: ९० टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी झळा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादअत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विभागातील सुमारे ४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांची दुष्काळामुळे धूळधाण झाली असून, एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर ही माहिती महसूल विभागाने सादर केली.मराठवाड्यात खरीपाचे ५० लाख चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी हंगामात ४८ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन व कापसाची झाली. मराठवाड्यात यंदा १९ लाख ३३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १५.८१ लाख हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली, तर ८९ लाख हेक्टरवर ज्वारी, १.०३ लाख हेक्टरवर बाजरी आणि २.५८ लाख हेक्टरवर मका हे पीक घेण्यात आले होते. मात्र पावसाच्या मोठ्या खंडामुळे पीके वाळून गेली.एक जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमधील १५३ दिवसांपैकी ४१ दिवस पाऊस, तर तब्बल ११२ दिवस कोरडे ठरले. जुलै आणि सप्टेबर महिन्यांत पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. काही ठिकाणचे पूर्ण पीक करपून गेले. जून महिन्यात चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी कापसाच्या एक, दोन वेचण्या झाल्या, मात्र त्यानंतर कापूस आला नाही. सोयाबीनचीही अवस्था अशीच होती. शेंगा आल्या, मात्र त्यात दाणे काही भरले नाही. पावसाच्या या अवस्थेमुळे रब्बीची अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही. गावोगावात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे हाल आहेत, पाणी नसल्यामुळे सध्या विभागात पाचशे पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. या सर्व बाबींचा तपशील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडण्यात आला.जिल्हानिहाय स्थितीजिल्हा..............बाधित क्षेत्र ................शेतकऱ्याची संख्याऔरंगाबाद..........७ लाख......................६ लाख ६२ हजारजालना..............६ लाख १ हजार .........६ लाख ५२ हजारबीड..................८ लाख ४६ हजार........८ लाख ५६ हजारलातूर................२४ हजार...................२५ हजारउस्मानाबाद.........४ लाख ४१ हजार.......४ लाख ७३ हजारनांदेड................१ लाख ७१ हजार.......१ लाख ५९ हजारपरभणी..............३ लाख ४४ हजार .......२ लाख ६४ हजारहिंगोली..............२ लाख ४५ हजार........१ लाख ६५ हजारएकूण...............३३ लाख ७१ हजार.......३२ लाख ५५ हजार मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2RJHoUK

No comments

Powered by Blogger.