‘आयआयटी’च्या ८०० विद्यार्थ्यांना रोजगारसंधी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'आयआयटी' मुंबईत पहिल्या टप्प्यातील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुमारे ८०० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत. या फेरीत २७५ कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. ही फेरी शनिवारी सुरू झाली असून ती १६ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.यावर्षी सुमारे १,६५० विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी या कालावधीत सहभागी कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी जातील. या सर्व कंपन्यांची निवड करण्यापूर्वी प्लेसमेंट टीमकडून विशेष तपासणी करण्यात आल्याचे प्लेसमेंट अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी सहभागी कंपन्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. तर पहिल्यांदाच कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांची संख्या ४५ इतकी आहे. यंदा कंपन्यांनी वर्षभरात आयआयटी मुंबईतील १६५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटपूर्व ऑफर्स देऊ केल्या आहेत. यापैकी १२६ विद्यार्थ्यांनी या ऑफर्स मान्य केल्या आहेत. हे प्रमाणही मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी प्रथमच आयआयटीमध्ये 'इन्स्टिट्यूट सुपरवाइज्ड कॉमन अॅप्टिट्यूड टेस्ट'चे आयोजन केले होते. प्लेसमेंटसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यांची परीक्षा घेण्यात आली. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, अनेक कंपन्यांनी या परीक्षेचा निकाल ग्राह्य धरत त्यांची परीक्षा रद्द केली आहे. यंदा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये भारतीय कंपन्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभागही असणार आहे. त्यांच्यात आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असेल. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2zBfP98
from Maharashtra Times https://ift.tt/2zBfP98
Post a Comment