दिव्यांगांच्या शिक्षणखर्चाचा सरकारकडून परतावा

वृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाबाबत केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पुस्तके, गणवेश आणि बस खर्च आदी शालेय शिक्षणावर होणाऱ्या सर्व खर्चाचा परतावा करण्याच्या सूचना सरकारने सर्व शाळांना केल्या आहेत. हा खर्च केंद्र सरकार करणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल व 'माइंड ट्री'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेलन केलर पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.'दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ सौजन्य व सहानुभूतीची आवश्यकता नसते. त्यांच्या सबलीकरणासाठी शिक्षण हाच उपाय आहे. या मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार अशा विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होणारा सर्वप्रकारच्या खर्चाचा शाळांनी परतावा (प्रतिपूर्ती) करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. परताव्याची ही रक्कम केंद्र सरकार शाळांना देईल. दिव्यांग विद्यार्थिनीला दरमहा दोनशे रुपयांचे अर्थसाह्य देण्यात दिले जाईल,' अशी माहिती सिंह यांनी दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी किमान पाच टक्के राखीव प्रवेश ठेवण्याच्या सूचनाही चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. शिक्षणाचे प्रमाण कमीविविध समस्यांमुळे दिव्यांगांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, असे सांगताना सत्यपालसिंह यांनी याविषयीची आकडेवारी सादर केली. देशभरात एक कोटी २० लाख दिव्यांग असून त्यातील केवळ एक टक्का दिव्यांग शालेय शिक्षण घेतात, असे ते म्हणाले. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2FSD7g0

No comments

Powered by Blogger.