पुजाराचे दमदार शतक, टीम इंडियाच्या दिवसअखेर २५० धावा

अॅडलेड:भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात चेतेश्वर पुजारानं खणखणीत १२३ धावा ठोकल्या आहेत. त्याचं हे कसोटीतील १६ वं शतक असून पुजाराच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या आहेत.अॅडलेड येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सलामीची जोडी मैदानावर जास्तकाळ टिकाव धरू शकली नाही. लोकेश राहुल अवघ्या दोन धाव करून तंबूत परतला तर मुरली विजयही ११ धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केलं. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने सयंमी खेळीच प्रदर्शन घडवत शतकी खेळी केली. पुजाराने ७ चौकार आणि दोन षटकाराच्या सहाय्याने तडाखेबंद १२३ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला २५० धावापर्यंत मजल मारता आली. चौथ्या क्रमांकावर आलेला कर्णधार विराट कोहलीही अवघ्या तीन धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर पुजाराने अजिंक्य रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी २२ धावा केल्या. पण ही जोडी दीर्घकाळ मैदानावर टीकू शकली नाही. जोश हेझलवूडच्या एका चेंडूवर रहाणे झेलबाद झाला. त्याने केवळ १३ ठोकल्या. तेव्हा भारताची स्थिती ४ बाद ४१ अशी होती. त्यानंतर आलेल्या रोहीत शर्मानं संघाला अवघ्या ३७ धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत आणि रवींचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी २५ धावा ठोकल्या तर इशांत शर्माने ४ धावा केल्या. सध्या मोहम्मद सामी ६ धावांवर खेळत आहे.लाइव्ह स्कोअरकार्ड पाहण्यासाठी क्लिक करा:मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2KWOGBP

No comments

Powered by Blogger.