विराटच्या 'त्या' कृतीवर ऑस्ट्रेलियन कोचचा आक्षेप

अॅडलेड: फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्या खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहलीसारखा जल्लोष केला असता तर, 'जगातील सर्वात वाईट माणसं' म्हणत त्यांच्यावर टीका झाली असती, असं सांंगून ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक जस्टिन लँगर यानं कोहलीच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. तसंच त्यानं माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या टिप्पणीवरही टीका केलीय. ऑस्ट्रेलियानं अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सात विकेटच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून केवळ ट्रेव्हिस हेडनं अर्धशतकी खेळी केली होती. त्यावर सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं होतं. 'घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी घेतलेला बचावात्मक पवित्रा याआधी मी कधी अनुभवलेला नाही,' असं त्यानं म्हटलं होतं. त्यावर लँगरनं टीका करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना स्लेजिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सचिन जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा, तो काळ वेगळा होता. सचिन खेळत असताना ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर, डेव्हिड बून, स्टीव्ह वॉ, मार्क वॉ आणि रिकी पाँटिंग आदी खेळाडू होते. त्या खेळाडूंकडे मोठा अनुभव होता. पण आताच्या संघातील खेळाडूंना, विशेषतः फलंदाजांना तितका अनुभव नाही, असं लँगर म्हणाला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात जल्लोष करत आहे. त्यावर लँगरनं आक्षेप घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कोहलीसारखा जल्लोष केला असता तर, त्यांना 'जगातील सर्वात वाईट माणसं' ठरवली गेली असती, असं तो म्हणाला. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2L6bFdN

No comments

Powered by Blogger.