यूपीः सुबोध कुमार यांच्या पत्नीनं टाहो फोडला

बुलंदशहर उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारात शहीद झालेले पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांच्या पत्नीला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांना अश्रू अनावर झाले. 'त्यांच्या पार्थिवाजवळ मला जाऊ द्या, त्यांना केवळ एकदा स्पर्श करू द्या, ते माझ्या स्पर्शानं ठीक होतील', असा टाहो पत्नी रजनी यांनी हॉस्पिटलमध्ये फोडला. रजनी यांची ही स्थिती पाहून हॉस्पिटलमधील उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. बुलंदशहरात काल गोहत्येच्या संशयावरून उद्रेक झाला. जमावाने केलेल्या हिंसाचारात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी काल सायंकाळी जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबानं आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सुबोध कुमार यांचे पार्थिव पाहताच पत्नी रजनी यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हॉस्पलिटलमध्ये येताच टाहो फोडला. मला माझ्या पतीला केवळ एकदा स्पर्श करू द्या, ते माझ्या स्पर्शाने ठीक होतील, असे रजनी वारंवार सांगत होत्या. रजनी यांची ही स्थिती पाहून हॉस्पिटलमध्ये आलेल्या सर्वांचे डोळे पाणावले होते. शहीद पोलीस अधिकारी सुबोध कुमार हे दोन भावामध्ये सर्वात छोटे होते. त्यांचे मोठे भाऊ अतुल कुमार राठौर लष्करात होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत व्यवसाय सुरू केला. सुबोध कुमार यांचे वडीलही पोलीस दलात कार्यरत होते. बुलंदशहरमधील हिंसाचारावर सुबोध कुमार यांच्या मुलानं प्रश्न उपस्थित केले आहेत. मी एक चांगला नागरिक व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. आज माझे वडील हिंदू-मुस्लीम वादात शहीद झाले. उद्या आणखी कुणाचे तरी वडील यात शहीद होतील?, असा सवाल अभिषेक सिंहने उपस्थित केला. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2rlI9I4

No comments

Powered by Blogger.