
भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर आज आपला ४१वा वाढदिवस साजरा करतोय. अजित आगरकर प्रसिद्ध गोलंदाज असला तरी फलंदाजीचा विक्रमही त्याच्या नावे आहे. तो एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय फलंदाज आहे. त्याचा हा विक्रम सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा इतर कुणीही भारतीय फलंदाज तोडू शकलेले नाही. आगरकरने २१ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेटपटू म्हणून सर्वात कमी सामन्यांमध्ये १००० धावा आणि २०० बळी मिळवण्याचे विक्रमही त्याच्याच नावे आहेत.
from Maharashtra Times https://ift.tt/2SqHf8r
Post a Comment