१२६१ बालमृत्यू; १ लाख बालके मृत्यूच्या छायेत

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील १ लाख २२७ बालके पोषण आहाराअभावी मृत्यूच्या छायेत असून ० ते ५ वयोगटातील एकूण १२६१ बालमृत्यू हे सप्टेंबर महिन्यादरम्यान झाल्याची कबुली राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यात नवजात शिशू तसेच बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यासंदर्भात आमदारांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, अमित देशमुख, राजेश टोपे, अस्लम शेख, नसीम खान आदींनी हा प्रश्न उपस्थित केला. राज्यात पोषण आहाराअभावी मृत्यूच्या छायेत १ लाख २२७ बालके असून आदिवासी भागातील बालकांची संख्या ३८ हजार १९९ इतकी असताना ० ते ५ वयोगटातील १२६१ बालमृत्यू झाले ही माहिती खरी आहे. २००८ मध्ये नवजात शिशू मृत्यूदर २४ होता. २००८ ते २१६ या दरम्यान हा मृत्यूदर ११ अंकांनी कमी होऊन १३ पर्यंत खाली आला आहे. राज्यात व आदिवासी भागात बालमृत्यू व नवजात शिशूंचे मृत्यू टाळण्यासाठी बऱ्याच उपाययोजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर माता व बालकांचे लसीकरण करणे, नवजात बालकांची काळजी घेणे, त्यांना स्थिरीकरण कक्षात ठेवणे, मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांमार्फत तपासणी करून उपचार करणे, नवसंजीवनी कार्यक्रमांतर्गत तपासणी व उपचार करणे तसेच बालक व नवजात शिशूंना जंतूसंसर्ग, जन्मतः श्वासरोध, श्वसनाचा जंतुसंसर्ग होणार नाही याबाबत काळजी घेणे, कमी दिवसांचे बाळ व जन्मतः कमी वजन असलेल्या बाळाची विशेष काळजी घेणे, दर वर्षी जुलै महिन्या अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविणे यासारख्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. डेंगी, कॉलरा, गॅस्ट्रोच्या पेशंटमध्ये वाढराज्यात सप्टेंबर महिन्यात स्वाइन फ्लूचे ११६७ पेशंट उपचार घेत असून त्यापैकी १०१ पेशंटचा मृत्यू झाल्याची माहिती विधानपरिषदेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. त्याच वेळी राज्यात दूषित पाणी आणि डासांच्या वाढीमुळे डेंगी, मलेरिया, कॉलरा, गॅस्ट्रो सासारख्या साथींच्या आजाराच्या पेशंटमध्ये वाढ होत असल्याची कबुलीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. या संदर्भात अजित पवार, संग्राम थोपटे, राहुल कुल, जयंत पाटील, प्रणिती शिंदे, महेश लांडगे, विश्वजित कदम यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट केले. साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असली तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. प्रभावी साथरोग नियंत्रणासाठी ७ एप्रिल २०१५ मध्ये साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली. स्वाइन फ्लू, डेंगी, मलेरिया, इतर साथींच्या नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमित साथरोग सर्वेक्षण, डेंगी, मलेरियासाठी साथरोग सर्वेक्षण, सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचाराच्या सुविधा, प्रयोगशाळा निदानाची व्यवस्था, अतिजोखमीच्या व्यक्तींना मोफत तसेच ऐच्छिक लसीकरण, वर्षातून दोन वेळा स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zyNUGG

No comments

Powered by Blogger.