गो चिकित्सेने कॅन्सरवर मात, भटकर यांचा दावा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'गो चिकित्सेमध्ये कॅन्सरवर मात करण्याचे गुणधर्म आहेत. आयआयटी दिल्लीत सध्या १०० संशोधक गायीवर पीएचडी करत आहेत. पुढे एक हजार जण यावर संशोधन करतील,' असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी गुरुवारी केले. कलाग्राम येथे आयोजित भारतीय किसान संघाचे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री बद्रीनारायण चौधरी, अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, प्रदेश महामंत्री बळीराम सोळंके, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर तुपे, स्वागताध्यक्ष रसदीपसिंग चावला आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्याच्या हस्ते गो माता पूजनानंतर तुपे यांच्या हस्ते ध्वजरोहन झाले. त्यानंतर भटकर यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी भटकर म्हणाले, 'रासायनिक शेतीमुळे आपले अन्न विषमय झाले आहे. गो शेतीच्या माध्यमातूनच खऱ्याअर्थाने समृद्धी येईल. गाईच्या मागे दडलेले विज्ञान समजून घेत गो विज्ञानाने शेती केली पाहिजे. गो शेती हा आपल्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वैदिक काळापासून आपण गो आधारित शेती करत आलो आहोत. संपन्न असलेल्या आपल्या देशावर आक्रमण करत शत्रूंनी लूट केली. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश जगात अर्थव्यवस्थेत २०० क्रमांकावर होता. आज तिसऱ्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या काळात भारत हा देशातील समृद्ध व अर्थव्यवस्थेत एक महान राष्ट्र असेल. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे. गाय हे महान तंत्रज्ञानच नव्हे, तर त्या पेक्षा मोठे आहे. गो शेतीतूनच खरी समृद्धी होईल. त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे. ऋषी म्हणजे ज्ञान. कृषी ऋषी संस्कृती निर्माण करायची आहे,' असे भटकर म्हणाले.कार्यकारिणीची निवडअधिवेशनात नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यपदी बळीराम सोळंके यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्षपदी सुभाष देशमुख, रावसाहेब शहाणे, रेखा चांदोरकर, महामंत्री मदन देशपांडे, मंत्रीपदी किशोर ब्रह्मनादकर, सुभाष महाजन, महेश सावंत, कोषाध्यक्षपदी बबनराव केंजळे, कार्यालयीन मंत्रिपदी संतोष पाटील, संघटनमंत्रीपदी चंदन पाटील यांच्यासह एकूण २१ जणांचा समावेश आहे. अधिवेशनातील ठराव दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. स्थलांतर थांबवण्यासाठी तरुण शेतकऱ्यांना, शेतमजुरांना कृषी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण व अर्थसहाय्य द्या. पुढील खरीप हंगामासाठी खते, बियाणे मोफत द्या. चाऱ्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.- शेतीला आठमाही पाणी द्या. सूक्ष्मसिंचन प्रणालीच्या पूर्ण संचास ९० टक्के अनुदान द्या. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीला द्या. शेती संदर्भातील कायदे हे परिशिष्ट नऊमधून वगळले जावेत तसेच संपूर्ण कायद्याचा फेरविचार करा. - कृषीपंपाना दिवसा पूर्णदाबाने दहा तास वीजपुरवठा करा. पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जानिर्मितीद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेच्या पुरवठ्याबाबत असणाऱ्या सर्व योजना विनानिवड निकष सर्व शेतकऱ्यांना सवलतीसह द्या.- प्रत्येक गावाच्या शेतशिवारात शेतमाल वाहतुकीसाठी बारमाही किमान दहा फूट रुंदीच्या शेत रस्त्यांचे किमान अर्धा चौरस किलोमीटरवर जाळे निर्माण करा. ३३ फुटांचे पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करावे. हे रस्ते सार्वजनिक मालकीचे असावेत. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2PaDXEy
from Maharashtra Times https://ift.tt/2PaDXEy
Post a Comment