मराठ्यांना १६% आरक्षण; कृती अहवाल विधानसभेत सादर

मुंबई: आठवडाभर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला मराठा आरक्षणाचा कृती अहवाल (एटीआर) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर करण्यात आला. या १५ पानी अहवालात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.न्या. गायकवाड यांच्या समितीने सादर केलेल्या मराठा आरक्षणावरचा कृती अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. या कृती अहवालात गायकवाड समितीच्या सर्व शिफारसी मंजूर करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असून ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. पंचायतीमध्ये मात्र मराठा समाजाला आरक्षण नसेल, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या नोकऱ्यांमध्येही या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.मुख्यमंत्र्यांनी एटीआर सादर केल्यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी गायकवाड समितीचा अहवालच विधानसभेत सादर करा, अशी मागणी केली. एटीआरनंतर मराठा आरक्षणाचे विधेयकही आज विधानसभेत सादर होण्याची शक्यता आहे.५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणार? मराठा आरक्षणामुळे घटनेच्या चौकटीची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार आहे. मराठा समाजाची परिस्थिती अपवादात्मक असून त्यामुळे विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यात येईल अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. विधानसभेच्या आवारात जल्लोष मराठा आरक्षणाचा एटीआर सादर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी विधानसभेच्या आवारात जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार आवारात पेढे वाटत आहेत तर वचनपूर्तीचे नारेही देत आहेत. विधानसभेचे कामकाज दीड वाजता पुन्हा सुरू होणार असून तेव्हा एटीआरवर चर्चा करण्यात येणार आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2U0ITiW

No comments

Powered by Blogger.