हा देश मोदींच्या वडलांची जहागीर नाही: राव

हैदराबाद:'मोदीजी, भारत हा काही तुमच्या वडलांची किंवा आजोबांची जहागीर नाही. ही लोकशाही आहे. तुम्ही किती दिवस सत्तेत राहाल? ' अशी सणसणीत टीका टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. हैदराबाद जवळ संगरेड्डी येथे प्रचारसभेला संबोधित करत होते. भाजप सत्तेत आल्यापासून साडेचार वर्षांत एकदाही चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली नव्हती. पण तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. तेलंगणातील मुस्लिम आणि आदिवासी अत्यंत मागास आहेत. त्यांच्या आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठी एक नाही ,दोन नाही तर तब्बल तीस पत्र चंद्रशेखर राव यांनी मोदींना लिहिली होती. पण एकाही पत्राला उत्तर मिळालं नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्र्याच्या शिफारशीने दिल्लीला जाऊन त्यांनी मोदींची भेट घेतली. आरक्षणाबाबत विचारणा केली असता 'मी आरक्षणाचा कोटा वाढवणार नाही आणि कोणाला वाढवू देणारही नाही' अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली. यामुळे निराश झालेल्या चंद्रशेखर राव यांनी देश हा काही तुमच्या वडलांची जहागीर नाही अशी समज मोदींना दिली आहे.बिगर काँग्रेस,बिगर भाजप सरकार सत्तेत आल्याशिवाय तेलंगणाचं भलं नाहीचजोपर्यंत बिगर काँग्रेस,बिगर भाजप सरकार सत्तेत येणार नाही तोपर्यंत तेलंगणाचा व इतर राज्यांचा विकास होणार नाही असं मत चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं आहे. तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार असून ११ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. टीआरएस पुन्हा आपला गड राखतं का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2Avdf4b

No comments

Powered by Blogger.