रुबेला लसीमुळं नपुंसकत्व?; मुंब्रा, कौसात धास्ती

म. टा. प्रतिनिधी, ठाणेलस टोचल्याने नपुंसकत्व येत असल्याच्या समजुतीवर ठाम असलेल्या पालकांचा विरोध प्रबोधनानंतरही कायम असल्याने लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी कौसा, मुंब्रा या भागांमध्ये अवघे १३ टक्के लसीकरण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मिझेल रुबेला मोहिमेचे इंजेक्शन शाळेत टोचण्याला शाळा प्रशासनासह पालकांचाही असलेला विरोध कमी करत त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे उभे ठाकले आहे.मिझेल रुबेला या रोगांवर प्रतिबंधात्मक लस देत रुबेलामुक्त भारताचे स्वप्न शासनाने पाहिले असले तरी स्मार्ट सिटी आजही अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते. झपाट्याने प्रगती करणाऱ्या वैद्यकशास्त्राच्या मदतीने लसीकरण करण्याचा बेत शासनाने आखला असला तरी या अंधश्रद्धेच्या सबबीवर या लसीकरणाला विरोध करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मोहिमेची घोषणा झाल्यापासूनच कौसा मुंब्रा या भागांतून त्याच्यावर जोरदार टीका होत असताना त्याचेच पडसाद मोहिमेच्या पहिल्या दिवशी दिसून आले. मंगळवारी ठाणे महापालिकेतर्फे २२ शाळांमध्ये मोहीम सुरू केली असली तरी उर्वरित शाळांमध्ये सरासरी ८० टक्के नोंदणी झाली असतानाच मुंब्रा, कौसा या भागात सरासरी पाच टक्के नोंदणी झाल्याचे दिसून येते. पालकांचा विरोध कमी व्हावा यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले जात असून १०० हून अधिक उर्दू भाषेतील पोस्टर, धर्मगुरूंची मदत यांसारखे अनेक पर्याय महापालिकेने राबविले असले तरी प्रत्यक्ष मोहिमेतही पालकांचा विरोध कायम आहे. लस टोचल्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होत असून नपुंसकत्व येत असल्याच्या समजाने शाळेत ही लस टोचण्याला परवानगी देणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकांनी दिला आहे. शाळा प्रशासनानेही त्याला पाठिंबा दिला असून अनेक शाळांनी परवानगी पत्र पालकांकडे मागितले आहे. लसीकरणाबाबत मुलांची जबाबदारी शाळा घेणार नसल्याचे या पत्रात स्पष्ट केल्याने पालकांच्या भितीत वाढ झाली आहे. मोहिमेबाबत परवानगी पत्र मागणे गैर असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या मोहिमेस विरोध करणाऱ्या ४४ शाळा असून त्यामध्ये २५ शाळा आणि १९ नर्सरी यांचा समावेश आहे. धर्मगुरूंची बैठकया योजनेबाबत पालक आणि शाळांचे गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न अपुरे पडत असताना धर्मगुरूंची मदत घेतली जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये शाळा प्रशासन, धर्मगुरू यांची नव्याने बैठक घेतली जाणार आहे.मोहीम ही केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. त्याबाबत शाळा अथवा पालकांनी कोणतीही शंका निर्माण केली नाही तर निश्चितच सुरळीत मोहीम होऊ शकेल. कौसा मुंब्रा या भागांतून पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आरोग्य, शिक्षण असा सर्व विभागांना एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न आहे.डॉ. वैजयंती देवगेकर, नोडल अधिकारी मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2AyUtZL

No comments

Powered by Blogger.