धक्कादायक; मुंबईत दररोज ३५ जण होतात बेपत्ता
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईचे आकर्षण सर्वांनाच. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत लोक येतात. सुमारे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत दररोज सुमारे ३५ जण बेपत्ता होतात. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ९४८५ जण बेपत्ता झाले असून, यामध्ये अठरा वर्षांवरील ७७४० तर, अठरा वर्षांखालील १७४९ मुला-मुलींचा समावेश आहे.सप्टेंबरपर्यंत बेपत्ता झालेल्या ७७४० पैकी ३७३१ पुरूष आणि ४००९ महिलांचा समावेश आहे. यातील २३३६ पुरुष आणि २४२१ महिला सापडल्या असून, १३९६ पुरुष आणि १५८८ महिलांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. मुंबई पोलिसांनी सन २०१५ ते २०१७ या कालावधीत मुंबई तसेच रेल्वे पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान' प्रभावी राबविल्यामुळे सुमारे २० हजारांहून अधिक लोकांना शोधण्यात आले. यावर्षी डिसेंबरमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांचे हरवलेल्या व्यक्तींचे केंद्र आणि प्रत्येक पोलिस ठाणी यामध्ये सहभागी होणार आहेत.८०३४ जणांना शोधण्याचे आव्हान सन २०१४पासून सप्टेंबर, २०१८पर्यंतची आकडेवारी पहिल्यास ४३,२२३ जण बेपत्ता झाले असून, त्यापैकी ३६,१४९ लोकांना शोधण्यात आले आहे, तर या कालावधीत १०,०१६ अल्पवयीन मुलगे आणि मुलींचे अपहरण झाले असून, त्यापैकी ९०५६ जणांना शोधण्यात यश आले आहे. तरीही पोलिसांसमोर अद्याप ८०३४ जणांना शोधण्याचे आव्हान आहे. यामध्ये ७०७४ प्रौढ आणि ९६० अल्पवयीनांचा समावेश आहे. अपहरणाचे गुन्हेबेपत्ता प्रकरणामध्ये पोलिसांकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही तसेच तपासही गांभीर्याने होत नाही. याची दखल घेत अठरा वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी हरवल्यास बेपत्ता झाल्याची तक्रार न करता अपहरणाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सन २०१८मध्ये नऊ महिन्यांत अठरा वर्षाखालील ६१९ मुले तर ११३० मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी ४७३ मुलांना तर ८२२ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. १४६ मुलांचा आणि ३०८ मुलींचा अद्याप पत्ता लागलेला नाही. बेपत्ता घटनांमागील प्रमुख कारणे - कौटुंबिक वाद - वृद्ध घराची वाट विसरणे - लग्नाचे किंवा अन्य आमिषाने पलायन - भिक्षा, बालमुजरीसाठी अपहरण - देहविक्रीसाठी मुलींचे अपहरण - प्रेमविवाहास कुटुंबीयांचा विरोध - गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांकडे दुर्लक्ष - घरी परतायचे नसल्याने ओळख बदलून राहणे वर्ष बेपत्ता व्यक्तींची एकूण संख्या सापडलेल्या व्यक्ती पुरुष महिला पुरुष महिला २०१४ ४२१९ ४१७० ३७५९ ३९४३२०१५ ४४१७ ४३१५ ३८९० ४०३९२०१६ ४६४९ ४५२७ ४०७१ ४०९६२०१७ ४५८७ ४५९९ ३८०९ ३७८५अठरा वर्षांखालील मुलांची आणि मुलींची आकडेवारी वर्ष एकूण संख्या सापडलेल्या व्यक्ती मुलगे मुली मुलगे मुली २०१४ १०२७ १५०० ९८६ १४७५२०१५ ६५३ ९२७ ५९४ ८७८२०१६ ७३४ ११६९ ६८३ १०९१ २०१७ ८८९ १३६८ ८१९ १२३५सन २०१८मधील आकडेवारी महिना एकूण संख्या सापडलेल्या व्यक्ती प्रौढ अल्पवयीन प्रौढ अल्पवयीन जानेवारी ८१२ १९६ ५०५ १५१फेब्रुवारी ७८२ १८१ ४७७ १३४मार्च ८८४ १९७ ५७७ १५७एप्रिल ९१६ १६८ ५५७ १३०मे ९१६ १८७ ५४१ १४०जून ९१२ २१५ ५४९ १५६जुलै ८३५ १९४ ५५३ १४०ऑगस्ट ८३९ २१३ ५१८ १५२सप्टेंबर ८४४ १९८ ४८० १३५- चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत ७७४० हरवले - अठरा वर्षांखालील १७४९ जणांचे अपहरण - ४७५७ जणांना शोधण्यात यश; २९८३ बेपत्ता मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2AuUspz
from Maharashtra Times https://ift.tt/2AuUspz
Post a Comment