ग्राहकांना शॉक; वीज आणखी कडाडणार!

sandeep.shinde@timesgroup.comठाणे: अनपेक्षितरित्या वाढलेल्या वीज बिलांमुळे ठिकठिकाणच्या ग्राहकांना बसणाऱ्या शॉकची तीव्रता भविष्यात आणखी वाढणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून विजेचे दर वाढल्याने आणि ऑक्टोबर महिन्यातील वाढीव वीज वापरामुळे सध्याची बिले वाढली आहेत. त्यापाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातील भारनियमन टाळण्यासाठी महावितरण कंपनीने चढ्या दराने जी वीज खरेदी केली होती त्यापोटीचा इंधन अधिभार जानेवारी महिन्यापासून वसूल केला जाणार आहे. त्यातून ग्राहक सावरत नाही तोच एप्रिल, २०१९ पासून पुन्हा दरवाढ करण्याची परवानगी वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणला दिलेली आहेच. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट लावणारा वाढीव बिलांचा सिलसिला अटळ आहे. मुंबई वगळून उर्वरीत महाराष्ट्रात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचा तोटा प्रचंड वाढत असून दोन वर्षांत तब्बल ३४ हजार ६४६ कोटींची महसुली तूट येणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी 'एमईआरसी'ने २० हजार ६५१ कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल करण्याची परवानगी महावितरण कंपनीला १२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या निर्णयानुसार दिलेली आहे. मात्र, त्यापैकी ८ हजार २६२ कोटी रुपये येत्या दीड वर्षांत वीज ग्राहकांच्या बिलांमधून वसूल केले जाणार आहेत. त्यासाठी घरगुती वीज ग्राहकांचा विजेचा आकार, फिक्स्ड चार्ज वाढवण्यात आला आहे. तर, वीज दरवाढीसोबतच सवलतींना कात्री लावत औद्योगिक वीज ग्राहकांना मोठा धक्का देण्यात आलेला आहे. या मंजुरीतल्या पहिल्या टप्प्यातील दरवाढ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. ही दरवाढ आणि ऑक्टोबर महिन्यातल्या वाढीव वीज वापरामुळे विजेची बिले अक्षरशः कडाडली असून ठिकठिकाणचे ग्राहक त्यामुळे हैराण झाले आहेत. त्यांच्या त्रासात पुढील काही महिन्यांत आणखी भर पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरण कंपनीने पावर एक्स्चेंजवरून चढ्या दराने वीज खरेदी केली होती. त्यासाठी जो अतिरिक्त खर्च केला आहे तो इंधन अधिभाराच्या रुपाने जानेवारी महिन्याच्या बिलांमध्ये दिसू लागेल. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षात पुन्हा ३ ते ४ टक्के दरवाढीची परवानगी महावितरण कंपनीला मिळालेली आहे. यंदा एप्रिल महिन्यात अपेक्षित असलेली दरवाढ सप्टेंबरपासून लागू झालेली आहे. त्यामुळे जो तोटा सहन करावा लागला आहे त्याची भरपाई म्हणून एप्रिल २०१९ पासून मंजूर केलेली दरवाढ वाढवून देण्याची मागणी महावितरण कंपनी करेल. ही मंजुरी मिळाली तर वीज ग्राहकांना चांगलाच धक्का बसणार आहे. पिक्चर अभी बाकी हैआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांचा रोष पत्करावा लागू नये म्हणून २० हजार ६५१ कोटींच्या मंजुरीपैकी तब्बल १२ हजार ३८२ कोटींचा नियामक भत्ता राखून ठेवण्यात आलेला आहे. एप्रिल २०२० नंतर त्या वसुलीसाठी ग्राहकांच्या खिशात हात घातला जाणार आहे. त्यामुळे सध्या वीज दरवाढीचा फक्त 'ट्रेलर' ग्राहक अनुभवत असून 'पिक्चर अभी बाकी है', असेच म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ग्राहकांवर कोणतीही वीज दरवाढ लादणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने या आश्वासनांना हरताळ फासला आहे. वीज चोरी, वीज गळती आणि महावितरण कंपनीतल्या भ्रष्टाचाराला अभय देत राज्य सरकार, वीज नियामक आयोग आणि महावितरण कंपनीने संगनमताने वीज ग्राहकांवर दरवाढ लादलेली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. - प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना वीज बिलांमधली वाढवीज वापर वाढ (%)० ते १०० युनिट (घरगुती) ८१०१ ते ३०० युनिट (घरगुती) ४लघुदाब शेतीपंप १२उच्चदाब उपसिंचन ८उद्योग (११ केव्ही) ८उद्योग (३३ केव्ही) १२मुंबईतही भरमसाठ वाढउपनगरातील वीजपुरवठ्याची सूत्रे रिलायन्स एनर्जीकडून अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडे गेली आहेत. त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बिलात ५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. शीव ते कांजुरमार्ग तसेच माहीम ते दहिसर या पट्ट्यात वीजपुरवठा करण्याचे काम अदानी कंपनीकडे आले आहे. वाढीव बिलांमुळे या भागातील वीजग्राहक हैराण झाले आहेत. या दरवाढीवर काही दिवसांपूर्वीच काही सामाजिक संस्था तसेच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. बेस्टच्या बिलातही वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2TUkwTR

No comments

Powered by Blogger.